गोविज्ञान भारतीय शेतीला वरदान
DOI:
https://doi.org/10.64751/07evgz60Abstract
भारतीय गायीचे शेण आणि गोमूत्र याचा नैसर्गिक खत आणि कीटकनाशक म्हणून शेतकऱ्यांना उपयोगी ठरतो. याच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता वाढते. या शिवाय गायीपासून प्राप्त होत असलेल्या दूध, तूप, लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना पूरक व्यवसायातून आर्थिक विकास साधता येतो. गोविज्ञानाचा तंत्रज्ञानात्मक उपयोग करून आजच्या तरुणांना व महिलांना रोजगार प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. या शिवाय केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे गोरक्षण, गोसंवर्धन व गोविज्ञानास चालना मिळावी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या करिता सुरू केलेल्या योजनांचा व प्रशिक्षणाचा योग्य वापर केल्यास याचा मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल यात तिळमात्र शंका नाही.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






